पूर - Floods

पूर - Floods

* पावसाच्या जास्त पाण्याचे किंवा बर्फ वितळल्याने नदीपात्र तुडुंब भरून वाहते काही वेळा ते पाणी आजूबाजूच्या प्रदेशात पसरते, त्याला पूर म्हणण्याचा प्रघात आहे.

* पूर आपत्तीमध्ये अनेक नद्यामुळे सतत नुकसान होत आलेले आहे. चीनमधील हुवांग हो नदी अश्रूंची नदी म्हणून ओळखली जाते.


पूर नियंत्रण
* नदी नाल्याचे पुराचे पाणी आजूबाजूच्या प्रदेशात पसरू न देता नदीतून वाहून म्हणजे पूर संबोधले जाते.
* आपत्ती नियंत्रणासाठी पूर नियंत्रण करणे, नदीकीनाऱ्याची धूप थांबवून आजूबाजूचा प्रदेश सुपीक असते.
* नदीपात्रातील किंवा किनाऱ्यावरील बांधकाम, इमारती व तटबंधी यांना धोका पोहोचू नये.
* मार्गदर्शक बांध - बांधावरील माती वाहून जाऊ नये म्हणून पृष्ठभागावर सपाट दगडाचे आवरण उपयोगात आणले जातात.
* तिरबंध व तटबंधी - नदीचा जेवढा भाग सुरक्षित ठेवायचा असेल तर तेवढ्या भागात तिरबंध बांधतात तिर भागातील अंतर त्यांच्या लांबीच्या २ ते २.५ पट ठेवतात.
* नदीकाठ संरक्षण - नदीच्या काठाच्या संरक्षणासाठी दगडांचे दोन्ही नदीच्या काठांचे संरक्षण केले जाते.


पूर पाणी व्यवस्थापण
* पुररोधक तलाव - नदीतील पुराचे अतिरिक्त पाणी साठविण्यासाठी नदीमार्गात पूररोधक तलावाची आवशक्यता आहे.
* धरणे बांधणे - नदीवरील पुराचे अतिरिक्त पाणी साठविण्यासाठी नदीवर धरणे बांधावीत जेणेकरून पाणी अडवल्या जाईल.
* झायडार झी प्रकल्प - नेदर land उत्तर किनाऱ्यावर झायडर झी नावाचे एक मोठे अखात आहे. जेव्हा समुद्रामध्ये वादळ निर्माण होत असे तेव्हा या आखातात प्रचंड लाटा निर्माण होऊन किनारपट्टीचे खूप नुकसान होत असे.
* आजूबाजूची जमीन सुद्धा शेतीसाठी निरुपयोगी ठरत असे, याला पर्याय म्हणून उत्तर समुद्रात ६० किमी लांबीचा व २० मीटर उंचीचा मातीचा बंधारा बांधला गेला आहे.
* डेल्टा प्रकल्प - नेदर land नैऋत्य किनाऱ्यावर ऱ्हाईन नदीची सहा मुखे आहेत. उत्तर समुद्रातील वादळाने निर्माण होणाऱ्या आपत्तीचा तडाखा या मुखाभोवतीच्या प्रदेशाला बसतो.
* यावर उपाय म्हणून ऱ्हाईन नदीची ६ पैकी ५ मुखे नदीत मातीचे बांध घालून बंद करण्यात आलेली आहे. यालाच डेल्टा प्रकल्प असे म्हणतात.


पूरग्रस्त प्रदेश - पूरग्रस्त आसाम
* आसाम राज्याचा ४५% भाग पुराच्या तडाख्याप्रमाणे समाविष्ट होतो. ब्रह्मपुत्रा या लांब नदीच्या जलप्रवाहाखाली विशेषता महापुराच्या वेळी आसामच्या शेतीचे नुकसान होते.
* या राज्यातील दऱ्यासंबंधी २२ जिल्हे आहेत तर बराक नदीखोर्यांचा संबंध ५ जिल्ह्यांशी आहे. आग्नेय मान्सून वाऱ्यापासून या प्रदेशात अतिवृष्टी होते.
* जून २००४ मध्ये आलेल्या पुरामुळे या क्षतिग्रस्त खेडे १०,४२५, प्राणीजीवन विनाश २९,६६६, मानवी हानी २५३, संपूर्ण नष्ट झालेली घरे ५,७२,४१३ हेक्टर, पिकबाधित क्षेत्र १२,४७,८४५ हेक्टर इत्यादी प्रमाणात नुकसान झाले आहे.


खानदेश महापूर
* खानदेशातील चाळीसगाव परिसरात २०१० साली नदीच्या पुराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले त्या पुराच्या थैमानाने १ सप्टेंबर २०१० रोजी झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांना प्रचंड पूर आला.
* चोपडा शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या रत्नावती नदीला १ सप्टेंबर २०१० रोजी पूर येवून घरे, दुकाने, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
* सातपुड्यात व रावेर तालुक्यात बुधवार २ सप्टेंबर २०१० रोजी रात्री मुसळधार पाऊस होऊन नागझरी नदीला मोठा पूर आला.
* या पुरामुळे नदीकाठावरील १२०० हेक्टरमधील पेरू, कपाशी, केळी, इत्यादी पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.


मुंबई महापूर
* महाराष्ट्राची राजधानी आणि भारताचे प्रवेशदार असलेल्या मुंबई महानगराला वेळोवेळी अनेक आपत्तीचा सामना करावा लागतो.
* सन २००६ पासून मुंबई अनेक वेळा पुराच्या तडाख्यात सापडलेली आहे. या जलमय मुंबईच्या आजूबाजूच्या उपनगरांना या पावसाचा तडाखा बसतो.
* काही तासातच पडलेल्या पावसाने मुंबईकराचे चक्क मुंबई २४ तास बंद होती अशा प्रकारचे हाल झाले. पावसाची २००९ ची स्थिती म्हणजे यात प्रचंड प्रमाणात प्राणहानी व वित्तहानी झाली.


त्सुनामी लाटा
* समुद्राच्या तळाशी किंवा समुद्रकिनाऱ्याच्या जमिनीखाली भूकंपाच्या धक्क्यामुळे ज्या प्रचंड लाटा निर्माण होतात. त्यानी जपानी भाषेत त्सुनामी लाटा या नावाने ओळखले जाते.
* सागरी भूकंपातील त्सुनामीची निर्मिती होते. खरेतर सागरी भूकंपाची तीव्रता हि जमिनीवरील भूकंपापेक्षा अत्याधिक असून तिचे प्रभावक्षेत्र हजारो किमी असते.
* बंदरावरील लाटा ज्या त्सुनामी नावाने ओळखल्या जातात त्यांच्या निर्मितीचे मुख्य कारण म्हणजे समुद्रतळावर किंवा समुद्रतळाशी होणारा भूकंप होय.
* त्सुनामी लाटांचा वेग सुरवातीस ८०० किमी असतो. नंतर त्या लाटांची उंची वाढत जाते. आणि किनाऱ्यावर आदळेपर्यंत त्या लाटांची उंची सुमारे ५० ते ६० फुट एवढी असते.


त्सुनामीची कारणे
* जेव्हा सागरतळावर प्रस्तरभंग होतो किंवा तळाखाली भूहालचाली होऊन तळाशी पातळी वर खाली होते, तेव्हा त्सुनामी लाटा तयार होतात.
* जेव्हा सागरतळातील डोंगराळ भागावर जमिनीची घसरण होते तेव्हा घसरणीत दगड धोंड्याचा समावेश वाढतो त्यातूनच त्सुनामीची निर्मिती होते.


त्सुनामीसाठी व्यवस्थापन
* समुद्रकिनारी भागामध्ये निरनिराळ्या यंत्राद्वारे भू - हालचालीची सतत माहिती घ्यावी.
* नैसर्गिक होणारे बदल अभ्यासून त्या संदर्भात भविष्यकालीन कार्यवाहीकडे वळावे.
* धोक्याची पातळी व सूचना मिळताच तत्काळ किनारी भागातील स्थलांतर करून मासेमारी करणे, नौकायन किना अन्य सर्व कार्यास बंदी करावी.
* किनारी भागातील दळणवळण व्यवस्था, संपर्कासाठी हवाई सेवा उपलब्द केलेली असावी.
* या भागात हवाई सेवा उपलब्द करून द्यावी, वैद्यकीय सेवा उपलब्द करून द्यावी.
* किनारपट्टीवर बचावासाठी नारळाची झाडे उपयुक्त असल्याने एकतर झाडावर चढून जावे किंवा लाट ओसरेपर्यंत झाडाच्या बुंध्याला घट्ट पकडून ठेवावे.
* लाटेपासून तोंडाचा, चेहऱ्यांचा, डोक्याचा बचाव करण्यासाठी झाडापासून डोक्याचे अंतर निश्चित करावे. आणि घट्ट दोन पायावर तोल सांभाळता येईल असे उभे राहावे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.