जीवन परिचय
आचार्य विनोबा भावे हे गांधीवादी व सर्वोदयी नेते होते. त्यांचे संपूर्ण नाव विनायक नरहर भावे असे होते.
विनोबांचा जन्म ११ सप्टें १८८५ रोजी रायगड जिल्ह्यातील गागोदे या झाला. आईचे नाव रुक्मिणीबाई व होते. त्यांनी दहाव्या वर्षीच आजन्म ब्रम्हचार्य पाळण्याची प्रतीद्या केली व पालन केले. १९१४ मध्ये विद्यार्थी मंडळ या शिक्षण मंडळाची स्थापना केली.
समाज कार्य
त्यांनी पवनार या ठिकाणी परमधाम या आश्रमाची स्थापना केली.
ते व्ययक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही होते. त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली.
सन १९५१ पासून विनोबांनी भूदान चळवळीचा प्रारंभ केला. या चळवळीची सुरवात नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावी झाली. सब भूमी गोपाल की ही म्हणजे सर्व जमीन ईश्वराची आहे. आपण भूमीचा उपभोग घ्यायचा.
विनोबा भावे हे जय जगत चा घोष करणारे आधुनिक काळातील मानवतावादी संत होते.
विनोबांनी भाग्वातगीतेचे 'गीताई' हे समश्लोकी भाषांतर केले आहे. त्यांनी लिहिलेल्या स्वराजशास्त्र हा ग्रंथही प्रसिद्ध होता. मधुकर,विचापोठी, जीवनदृष्टी, अभंगव्रते , या ग्रंथाचाही त्यांच्या लेखनात समावेश होता.
महाराष्ट्र धर्म मासिकही त्यांनी काही काळ चालवले होते. प्रायोपवेशनाच्या मार्गाने १६ नोवेंबर १९८२ रोजी यात्रा संपवली.सन १९८३ मध्ये आचार्य विनोबा भावे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा