नैसर्गिक आपत्ती - भूकंप

नैसर्गिक आपत्ती - भूकंप

* पृथ्वीच्या कवचास, भूपृष्ठास किंवा त्याच्या अंतर्गत भागात जे कंपायमान होते, हादरे बसतात त्या स्थितीस भूकंप म्हटले जाते.
* नैसर्गिक कारणाने भूपृष्ठाखाली होणाऱ्या हालचालीमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात त्यालाच भूकंप असे म्हणतात. याचाच अर्थ असा कि भूगर्भातील निरनिराळ्या प्रक्रियामधून जी उर्जा निर्मिती होते. तिला कंप सुटतो.
* भौगोलिक दृष्टीने भूकंपाची सर्वाधिक शक्ती ज्या ठिकाणी एकवटलेली असते, त्या ठिकाणापासून भूकंप केंद्र म्हणतात.
भूकंप लहरीची नोंदणी यंत्रावर होते ते यंत्र सायस्मोग्राफ म्हणून ओळखले जातात.


भूकंपमापन
* भूकंप तरंगाची किंवा लहरीची तीव्रता मोजण्याचे प्रामाण डॉ चार्लर रिश्टर यांनी कालिफोर्निया ऑफ इन्स्टीट्युट टेकनॉलॉजी या ठिकाणी शोधले.
* त्यामुळे भूकंप तीव्रता ही रिश्टर स्केलमध्ये मोजली जाते. सामान्यपणे ३.५ तीव्रतेपासून ९.० तीव्रतेपर्यत रिश्टरमध्ये नोंद झालेली आहे.
* भूपृष्ठावर किंवा सर्वात आधी पोहोचणाऱ्या या अत्यंत जलद गतीच्या लहरी आहेत. भुकवचामध्ये ३० किमी खोलीपर्यंत त्यांचा वेग प्रत्येक सेकंदाला ६.५ किमी असतो.
* प्राथमिक लहरीपेक्षा कमी गतीच्या आणि प्राथमिक लहरीनंतर पोहोचणाऱ्या लहरी म्हणजे दुय्यम लहरी होत.
* प्राथमिक व द्वितीय लहरीनंतर येणाऱ्या लहरी भूपृष्ठलहरी या नावाने ओळखल्या जातात. या लहरीचा प्रवास भूपृष्टातून असतो. म्हणून त्यांना जास्त लांब प्रवास करावा लागतो.


जगातील काही प्रमुख भूकंप
* ३० सप्टेंबर १९९३ मध्ये महाराष्ट्रातील पश्चिम व दक्षिण भागात किल्लारीत भूकंप झाला व त्यात १० हजार लोक मृत्यूमुखी पडले.
* १७ जानेवारी १९९५ मध्ये जपानच्या कोबे शहरात शक्तिशाली भूकंपाने साडेसहा हजार लोक मृत्यूमुखी पडले.
* ३० मे १९९८ उत्तर अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा मोठा धक्का ४ हजार मृत्यूमुखी.
* २९ मार्च १९९९ उत्तर प्रदेशातील उत्तर काशी व चमोली येथे झालेल्या भूकंपात १०० पेक्षा जास्त मृत्यूमुखी पडले.
* २६ जानेवारी २००१ गुजरातमध्ये ७.९ तीव्रतेचा भूकंप दहा लाख बेघर, ३० हजार लोक मृत्यूमुखी
* ३ मार्च २००२ अफगाणिस्तानच्या भूकंपात १५० लोक मृत्यूमुखी पडले.
* २५ मार्च २००२ अफगाणिस्तानच्या उत्तर भागात धक्के ८०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले.
* २४ फेब्रुवारी २००३ चीनच्या पश्चिम भागातील प्रांतांना धक्का २६० जण मृत्यूमुखी पडले.
* १ मे २००३ तुर्कस्तान मध्ये झालेल्या भूकंपाने १६० जण मृत्यूमुखी पडले.
* २१ मे २००३ अल्जेरियाला भूकंपाचा धक्का २००० लोक मृत्यूमुखी पडले.
* २६ डिसेंबर २००३ इराणच्या दक्षिण भागातील भूकंपाच्या धक्क्याने २६ हजाराहून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले.
* २४ फेब्रुवारी २००४ मोरोक्कोच्या किनारी भागाला भूकंपाचा धक्का ५०० जण मृत्यूमुखी पडले.
* २६ डिसेंबर २००४ इंडोनेशियात झालेल्या भूकंपाने आलेल्या त्सुनामिने हजारो जणांचे बळी घेतले.
* २२ फेब्रुवारी २००५ इराणच्या केरमान प्रांतात झालेल्या ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने शंभर जण मृत्यूमुखी
* २८ मार्च २००५ इंडोनेशियात झालेल्या ८.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने १३०० लोक मृत्यूमुखी पडले.


भूकंपाची कारणे
* पृथ्वीच्या संतुलित व्यवस्थेत बदल झाला तर भूकंप उद्भवतात.
* ज्वालामुखीच्या उद्रेकाने तप्त लाव्हारस भूपृष्टवर येउन साचतो. त्याच्या दाबामुळे भूपृष्ठ याच्यावर हादरे बसतात.
* भुकवचाचे संतुलन होण्यास भूपृष्ठ याच्यावर झीज आणि भर कारणीभूत ठरतात. त्यातूनच जेथे झीज होते तेथील वजन कमी होते.
* अपसारी अभिसरणामुळे भूकवचात ताणनिर्मिती होऊन भेगा पडतात. दाबामुळे खडकांना वळ्या पडून हालचाली निर्माण होऊन भूकंप होतात.
* भूपृष्टातून अंतर्गत भागात पाणी झिरपते. आतील प्रचंड उष्णतेने त्या पाण्याची वाफ होते व ती वाफ कमकुवत पृष्ठभागातून बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा भूकंप होतात.
* पृथ्वीच्या आतील उर्जेने शक्तीने खडकावर दाब पडून तणाव निर्माण होतात. तेव्हा प्रस्तरभंग होऊन भूकवचात कंपन सुरु होते.
* पृथ्वीवरील भूकवच सलग नसून त्याचे लहान पट्ट्यामध्ये विभाजन झालेले आहे. ते सर्व भूमंच तरंगत असून परस्पराविरुद्ध दिशांनी सरकतात.
* अणुचाचण्या भूमिगत स्फोटामुळे भूकंप होतात. प्रचंड पाण्याच्या साठ्याने मोठ्या धरणाने जमिनीवर दाब पडून खडकांचा भ्रंश होऊन संतुलन बिघडते व कंपायमान सुरु होते.
* प्रचंड मोठमोठ्या खोलवर गेलेल्या खाणकामामुळे प्रस्तरभंग होतात. खडकांचे संतुलन बिघडते व भूकंप याचा धक्का बसतो.


भूकंपाची तिव्रता
* भूकंपाच्या तीव्रतेचे गणित सात स्तरावर मोजले जाते. त्यामध्ये सामान्य ते महाभयानक विनाशकारी भूकंपाचा समावेश आहे.
* भूकंप विध्वंसक ग्रेट - ८ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रता. जबरदस्त मेजर ७ ते ७.९ तीव्रता. शक्तीशाली ६ ते ६.९ तिव्रता, मोठा किंवा मॉडरेट ५ ते ५.९ तिव्रता, हलका किंवा लाईट ४ ते ४.९ तिव्रता, सामान्य मायनर ३ ते ३.९, अतिसामान्य व्हेरी मायनर ३ पेक्षा कमी.


भूकंपापुर्वी दक्षता
* भौगोलिकदृष्ट्या सर्व भूप्रदेशाचा अभ्यास करून भूकंप क्षेत्र निश्चित करावे. भूकंप क्षेत्रामध्ये ठराविक अंतरावर भूकंपाची भुगर्भाची हालचालीची नोंद घेणाऱ्या प्रयोगशाळांची यंत्राची उभारणी करून त्या प्रयोगशाळा क्रियाशील ठेवाव्यात.
* भूकंप क्षेत्रामध्ये मोठे जलविद्युत प्रकल्प, मोठे बांध करणे, उभारण्याचे प्रयत्न करू नये. शक्यतो लहान बंधारे बांधून जलसिंचनाच्या सोई करून घ्याव्यात.
* भूकंपग्रस्त भागात मदत कार्य करणाऱ्या संस्थांची केंद्राची उभारणी करावी. भूकंपग्रस्त भागात मदत कार्य करणाऱ्या संस्थांची केंद्राची उभारणी करावी.
* भूकंपग्रस्त भागामध्ये अन्नपदार्थ, कपडेलत्ते, पाणीपुरवठा इत्यादीच्या तत्काळ पुरवठ्याची हवाई सेवा उपलब्द करावी.
* भूकंपग्रस्त भागामध्ये वसतिस्थाने विखुरलेल्या स्वरुपात निर्माण करावीत. लाकडी फळ्यांचा, बांबूंचा किंवा सिमेंटच्या पत्र्यांचा उपयोग करून निवासस्थाने उभारावीत.
* ट्यूबवेल किंवा बोअरवेल यांची संख्या वाढवू नये. ठराविक किलोमीटर क्षेत्रात किती ठिकाणी भूगर्भाला छेद द्यावा यासाठी कडक नियंत्रण करावे.


भारतातील व जगातील प्रमुख भूकंप - खिल्लारी भूकंप १९९३
* महाभयानक आपत्तीच्या खिल्लारी भूकंपाचे एक भूवैज्ञानिक आव्हानच आहे. ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील खिल्लारी गावाला प्रमाणवेळेप्रमाणेच २९ सप्टेबर रोजी १० वाजून २६ मिनिटानी म्हणजे पहाटे ३ वाजून ५३ मिनिटांनी भूकंपाने अपघात केला.
* लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे २० गावातील १५ किलोमीटरच्या परिसरात १०,००० लोकांना मरण पत्करावे लागले.
* भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण पठाराच्या मध्यवर्ती भागातील रुपांतरीत खडकस्तराला धक्का देणाऱ्या त्या भूकंपाने प्रचंड प्रमाणात नुकसान पोहोचविले.
* अचानकपणे निर्माण झालेल्या या भूकंप आपत्तीने मोठ्या प्रमाणात वित्तहानी व प्राणहानी झाली. भूकंपाने सजीव सृष्टीला जो धोका पोहोचविला आहे त्यापूर्वी सन १८४३ मधील बेलोरीचा भूकंप, सन १९०० मधील कोईमतूर व सन १९९३ मधील खिल्लारीचा भूकंप उल्लेखनीय आहेत.
* सन १९६७ च्या कोयना भूकंपानेसुद्धा मोठ्या प्रमाणात विध्वंसक कार्य केलेले आहे. सन १९९३ च्या खिल्लारी भूकंपाने मोठ्या प्रमाणात भूकवचाला फोडून काढले.
* भूकंपाच्या तीन आठवड्यानंतर झालेल्या पाहणीत वायव्येकडील १ किमी ते १.५ किमी परिसरात संमिश्र स्वरूपाचे भूकवच तोडले गेले.


गुजरात भूज भूकंप २००१
* भारतीय ५२ व्या प्रजासत्ताक दिवशी म्हणजे २६ जानेवारी २००१ रोजी सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांनी गुजरातमधील कछ जिल्ह्यातील बचावू तालुक्यातील चोबारी गावाजवळ भूकंपाचा धक्का बसला.
* त्याची वास्तविकता म्हणजे २६ जानेवारी २००१ या साली भूकंप याचा धक्का बसला. स्थान भूज परिसर गुजरात येथे हा भूकंप झाला. कमाल तीव्रता १० रिक्टर स्केल च्या पेक्षा जास्त होती. खोली गहनता १६ किमी एवढी होती.
* या भूकंपात १९,७२७ लोक मृत्यूमुखी पडले. व १,६६,००१ एवढे झण झाले होते. कछ जिल्ह्यातील चोबारी गावाजवळ झालेल्या या भूकंपाचे चुंबकीय प्रमाण ७.६ आणि ७.७ असे होते.
* त्याची रिक्टर स्केल क्षमता १० एवढी होती. त्यामुळे या भूकंपाची तीव्रता सगळ्यात जास्त होती असे सांगण्यात येते.


सिक्कीम भूकंप २०११
* सिक्कीम २०११ या भूकंपाला हिमालय २०११ या नावानेदेखील संबोधले जातील. भारतीय राज्य सिक्कीम आणि नेपाळच्या सीमेवर झालेल्या या भूकंपाची वेळ संध्यकाळी ६ वाजून १० मिनिटांनी १८ सप्टेंबर होती.
* ईशान्य भारतामध्ये झालेल्या या भूकंपाचा संबंध भारत, नेपाल, भूतान बांगलादेश आणि तिबेट या देशाशी होता.
* भूकंपाची वास्तविकता म्हणजे १८ सप्टेंबर २०११ या साली झाला. भूकंपाचा कालावधी ३० ते ४० सेकंद एवढा होता. भ्काम्पाची खोली १९.७ किमी एवढी होती.
* भूकंप क्षमता ६.९ एवढी होती. या खेरीज सिक्कीमच्या या भूकंपात सिंगतामजवळील पूर्व सिक्कीम जिल्ह्यातील व्यक्तीवर आघात पोहोचला.
* काठमांडू ब्रिटीश एबसिची इमारत या परिसरात भूकंपाने पडली. नेपाळ मधील ११ व्यक्ती मृत्यूमुखी पडले.


फुकुशिमा भूकंप २०११
* जपानच्या फुकुशिमा या ठिकाणी ११ एप्रिल २०११ रोजी संध्याकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी मोठ्या प्रमाणात भूकंपाचा आघात झाला. त्या भूकंपाची वास्तविकता पुढीलप्रमाणे आहे.
* जपानच्या या भूकंपात २,२०,००० व्यक्ती बेघर झाले. मोठ्या प्रमाणात बांधकाम क्षेत्राचे नुकसान झाले.


बांदाआच भूकंप २००४
* हिंदी महासागरात २००४ साली उसळलेल्या भूकंपाने इंडोनेशिया, श्रीलंका आणि भारत परिसरात भूकंपाचा धक्का बसला.
* या भूकंपामध्येच बांदाआच हे प्रमुख स्थान असल्याने तो भूकंप बांदाआच २००४ या नावाने संबोधला गेला.
* २६ डिसेंबर २००४ या रोजी इंडोनेशिया या देशात ९.३ तीव्रतेचा व त्याची गहनता ३० किमी एवढी होती. या भूकंपाचे परिणाम म्हणजे २,३०,२४० मृत्यूमुखी झाले.

2 टिप्पणी(ण्या):

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.