जलविद्युत

*नदीजोड प्रकल्प तसेच महाकाय योजनातून निर्माण झालेल्या समस्या यासाठी सर्व ठिकाणी चर्चा सुरु आहे. तर त्यावरून नदीजोड प्रकल्प भारतीयासाठी अत्यावश्यक असल्याचे सर्वांच्या लक्षात आलेले आहे.

* भारतातील नद्यांचे जलसाठ्यांचे प्रमाण विषम असल्याने नदीजोड प्रकल्प आवश्यक झाले आहेत. नद्यांच्या प्रवाहामध्ये वाहणाऱ्या पाण्याच्या साठ्यात सर्वाधिक जलसाठा ब्रह्मपुत्रा नदी, कोकण आणि किनारपट्टीतील नद्या, ब्राह्मणी नदी, वैतरणी नदी, व गोदावरी, नर्मदा, यासारख्या नद्यात ५ ते ८ मीटर हजार घनमीटर आढळतो.

* नदीजोड प्रकल्पामध्ये उत्त्तर भारतातील गंगा - ब्रह्मपुत्रा, कोसी - घागरा, गंडक - कोसी, शारदा - यमुना, यमुना - राजस्थान, राजस्थान - साबरमती, चुणार, गंगा - दामोदर - सुवर्णरेखा, सुवर्णरेखा - महानदी,

* कोसी - मेची, कावेरी - वैगई - गुंदर, केन - बेटवा, दक्षिण भारतात महानदी - गोदावरी, गोदावरी - कृष्णा, कृष्णा - पेन्नार, पार - तापी - नर्मदा, दमनगंगा - पिंजल, वेदती - वरदा, नेत्रावती - हेमावती,

* नदीजोड प्रकल्पावरील व त्यावरील विद्युतप्रकल्प यासाठी अंदाजे खर्च २,६९० अब्ज रुपये येणार असून त्यापासून ३४,००० MV विद्युतनिर्मिती होईल.

* नदीजोड प्रकल्पात ३० प्रमुख जोड कालवे, ३६ प्रमुख धरणे, १०,८८० प्रकल्प व कालव्यांचा समावेश आहे. या प्रकल्पातून दरवर्षी १७४ घनकिलोमीटर पाणी वळविण्यात येईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.