हरित क्रांती व पर्यावरण

हरितक्रांती विकास
* हरित क्रांतीचे जनक नोबेल परीतोषिक विजेते नॉर्मन बोरलॉग यांच्या कल्पनेतून हरित क्रांती हि नवीन शेतीची पद्धती १९६० साली उदयास आली आहे.

* अमेरिकन कृषी शास्त्रज्ञानी विकसित केलेल्या हायब्रीड बियाणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने बदल झालेला आहे. व कृषी उत्पादन हरित क्रांतीमुळे एकदम वाढले.

* अधिक उत्पादन देणारी बियाणे जशी गहू, भात, मका, बाजरी, ज्वारी, इत्यादी संशोधित बियाणे यांच्यामुळे कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

* प्रमाणित बी हे भरपूर उत्पादन देते, त्यामुळे भारतात आज १०००० हजार पेक्षा जास्त बीज गुणन केंद्रे स्थापन करण्यात आली आहे.

* रासायनिक खते - जगातील बहुतेक भागात वर्षानुवर्षे शेतीसाठी जमिनीचा वापर केला जात आहे. त्यामुळे उत्पादनवाढ झालेली आहे.

* लघुसिंचन योजना - भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची कृषी उत्पादनात वाढ व्हावी यासाठी विविध सरकारी लघुसिंचन योजना राबविल्या त्यामुळे उत्पादनात वाढ झाली.

* दुबार पिके घेणे ज्या भागात जलसिंचनाच्या सुविधा आहेत यासाठी दुबार, तिबार पिके घेणे.

* विविध रासायनिक जंतुनाशके व तननाशके यांच्या वापरामुळे रोपांचे संरक्षण करण्यात आले.

* भूमी संवर्धन - हरित क्रांतीच्या इतर तत्वाबरोबरच भूमी संवर्धन हे महत्वाचे आहे.


हरित क्रांती व सामाजिक आर्थिक बदल
* खाद्यान्य उत्पादनात वाढ - हरित क्रांतीमुले खाद्दान्य उत्पादनात वाढ करण्यात आली. भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.

* अन्न धान्याच्या आयातीत घट हरित क्रांती यांच्यामुळे उत्पादनात वाढ झाल्यामुळे प्रगतीपथावर असलेल्या देशात अन्न आयात यांची घट झाली.

* ग्रामीण रोजगारात वाढ - हरित क्रांती याच्यामुळे शेतकरी दुबार तिबार पिके घेत असल्यामुळे ग्रामीण भागात वर्षभर रोजगार पुरेल इतका रोजगार उपलब्द झाला.

* पारंपारिक कृषीपद्धतीत बदल करून खते, कीटकनाशके, यांचा वापर करून शेती उत्पादन वाढले आहे.


हरित क्रांतीचे परीस्थितीकिय परिणाम
* प्रादेशिक असमतोल - भारतात हरित क्रांती याचा प्रभाव देशातील पंजाब, हरयाणा, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, व गुजरात या विकसित राज्यात जास्त झाला. त्यामुळे प्रादेशिक असमतोल घडून आला.

* पिक उत्पन्नात असमानता - हरित क्रांतीचा प्रभाव मुख्यता गहू व तांदूळ या पिकावर पडलेला आहे. ज्वारी,
बाजरी, मका, यांच्यावर प्रभाव पडला. त्यामुळे पिक उत्पादनात असमानता निर्माण झाली.

* रासायनिक व कीटकनाशक याच्यामुळे प्रदूषण समस्या निर्माण झाल्या आहेत.

* मृदेच्या सुपिकतेचा ऱ्हास - वर्षनुवर्षे एकाच पिक पद्धती घेत असल्यामुळे सुपीक जमिनीचा ऱ्हास होत आहे.

7 टिप्पणी(ण्या):

  1. मला हरित क्रांती वर प्रकल्प लिहायायचे तर थोडी उपयुक्त माहिती मिळेल का

    उत्तर द्याहटवा
  2. Haritkranti cha itihas. स्पष्टीकरण, आणि नियम...


    उत्तर द्या प्लीज.

    उत्तर द्याहटवा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.