* सप्टेंबर १९२० मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात महात्मा गांधीनी असहकार चळवळीचा ठराव मंजूर करून घेतला.
* सी. आर. दास व बेझंट इत्यादी नेत्यांनी या चळवळीला विरोध केला. तरी या उठावावर सखोल चर्चा झाल्यानंतर बहुमताच्या जोरावर असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला.
* हिंदी लोकांनी इंग्रज प्रशासनातील सर्व नोकऱ्यांचा त्याग करावा.
* ब्रिटीश शासनाच्या प्रत्येक सभा, समारंभावर बहिष्करावर त्याग करावा.
* ब्रिटीश शाळांवर बहिष्कार टाकून आपसातील मतभेद ग्रामसभेच्या माध्यमातून सोडवावे.
* इंग्रजांच्या कायदेमंडळाच्या निवडनुकीवर बहिष्कार टाकावा.
* दैनंदिन उपभोगामध्ये केवळ स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा.
* प्रत्येकाने ब्रिटीश मालावर बहिष्कार टाकावा.
असहकार चळवळीचा शेवट
असहकारचा शेवट - असहकार चळवळीने पूर्ण हिंदुस्तानात इंग्रजांच्या मनात धास्ती भरली होती. चळवळीचा कार्यक्रम सर्वत्र जोमाने सुरु असताना उत्तर प्रदेशातील चौरीचोरा या ठिकाणी ५ फेब्रुवारी १९२२ रोजी एक मिरवणुकीवर गोळीबार केला. संतप्त झालेल्या लोकांनी मात्र पोलिस कचेरीवर हल्ला करून कचेरीस आग लावली. यावेळी जवळपास २१ पोलिस मारले गेले.
अपयशाची कारणे
* संपूर्ण देशात जुलुमी इंग्रजांच्या विरोधात चालू असलेल्या या चळवळीमध्ये थोडीफार हिंसात्मक घटना घडणारच होती. त्याकडे गांधीजीनी दुर्लक्ष केले. व संपूर्ण अहिंसात्मक चळवळीची अपेक्षा केली.
* हिंदू - मुस्लिम एकतेसाठी गांधीजी भूमिका योग्य असली तरीही खिलाफत चळवळ हि धार्मिक तर असहकार चळवळ हि स्वराज्यासाठी होती.
* असहकार ठरावामध्ये मांडण्यात आलेल्या अटी व नियमांची सर्व नागरिकांनी अंमलबजावणी केली नाही.
* परदेशी माल विकत घेवून जाळून टाकणे किंवा त्या मालाची होळी करणे, यातून स्वराज्याचा उद्देश फारशा साध्य होऊ शकत नाही
* चळवळ सुरु असताना राष्ट्रसभेतून प्रागतिक पक्ष नावाचा पक्ष बाहेर पडला होता.
21 पोलिस आणि ऐक अधिकारी पण मारला गेला होता.
उत्तर द्याहटवा