राष्ट्रसभेची स्थापना

राष्ट्रसभेच्या स्थापनेपुर्वीच्या हालचाली

* हिंदी लोकांच्या दु:खांना वाचा फोडण्यासाठी, विशेषत: सुशिक्षित हिंदी तरुणात ऐक्याची भावना निर्माण करून सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी, सुरेंद्रनाथ बनर्जी यांनी बंगालमध्ये २६ जुलै १८७६ साली तरुणांची ' इंडियन असोसिएशन '  ची स्थापना केली.
* १८५१  सालीच बंगाली विचारवंतानी ' ब्रिटिश इंडिया असोशिएशन ' स्थापन केली होती.
* मुंबईमध्ये या सुमारास  ' बॉम्बे असोसिएशन ' नावाची संघटना नौरोजी, शंकरशेठ, तेलंग, फिरोजशहा मेहता आदींनी स्थापना केली.
* १८६७ साली पुण्यात ' सार्वजनिक सभा ' स्थापना झाली.
* १८८४ साली मद्रासमध्ये ' महाजन सभा ' नावाची संघटना स्थापना झाली.

राष्ट्रसभेची स्थापना 
१८५७ च्या उठावानंतर आपल्या स्वातंत्र्यासाठी जुने नेतृत्व व जुन्या प्रेरणा उपयोगी पडणार नाहीत. याची खात्री लोकांना झाली. याच वर्गाने येथून पुढे आपल्या समाजाचे नेतृत्व केले व कालांतराने स्वातंत्र्याची चळवळ उभी केली. या स्वातंत्र्याच्या चळवळीचा उदय होण्यापूर्वी प्रथम राष्ट्रवादाचा उदभव झाला.

राष्ट्रसभेच्या (काँग्रेसच्या) स्थापनेची कारणे
* विविध धर्मसुधारणा चळवळ - १९ व्या शतकात हिंदुस्तानात ब्राम्होसमाज, आर्य समाज, थिओसोफ़िकल सोसायटी, रामकृष्ण मिशन, प्रार्थना समाज, धर्मसंघटना तयार झाल्या. या धर्मसुधारणा सुरु करणाऱ्या राजा राममोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, या महान पुरुषांनी जागृती घडून आणली.
* समाजसुधारकांचे प्रयत्न
* पाश्चात्य शिक्षणाचा परिणाम

वृत्तपत्रांची महत्वपूर्ण कामगिरी

हिंदुस्तानातील अगदी प्रारंभीची  वृत्तपत्रे इंग्रज गृहस्थांनी सुरु केली होती. प्रारंभीच्या कालखंडात ' दि इंडियन मिरर - कलकत्ता, बॉम्बे समाचार व इंदुप्रकाश - मुंबई, द हिंदू - मद्रास, ट्रिब्युन - लाहोर, वृत्तपत्र हे जनजागृतीचे व राजकीय असंतोषाच्या निर्मितीचे फार मोठे साधन आहे. राजा राममोहन राय - संवाद कौमुदी, देवेंद्रनाथ - तत्वबोधिनी पत्रिका, अरविंद बाबूचे - वंदे मातरम, सुरेंद्रनाथांचे - बंगाली, लोकमान्यचे - मराठा, केसरी  व लाला लजपतराय यांचे - द पिपल.


राष्ट्रसभेची स्थापना व कार्य
* राष्ट्रीय साहित्याची कामगिरी
* हिंदुस्तानच्या प्राचीन संस्कृतीचे पश्चात्त संशोधक व त्यांचे कार्य
* इंग्रजी भाषेचे हिंदी एकात्मतेस सहाय्य
* रेल्वे, तारायंत्रे, पोष्ट इत्यादी भौतिक सुधारणांचा हातभार
* इंग्रजांच्या अतिकेंद्रित राज्यकारभाराचा परिणाम
* आर्थिक शोषण करण्याचे इंग्रजांचे धोरण

लॉर्ड लिटनची दडपशाही धोरणे

* याच सुमारास लिटनने 'Arms Act' पास करून हिंदी लोकांच्या हत्यारे बाळगन्यावर कडक निर्बंध लादण्यात आले.
* इंग्रजांचा वंशश्रेष्ठत्वाचा अहंकार व उद्दामपणा
* इल्बर्ट बिलापासून मिळालेला धडा
* हिंदी सुशिक्षीतावरील अन्याय

१८८५ ते १९०५ या काळातील राष्ट्रसभेची कामगिरी

* सरकारविरुद्ध घेतलेला आक्रमक पवित्रा
* राष्ट्रसभेत हिंदी लोकांनी उत्साह निर्माण केला.
* युरोपियन नेत्यांचे सहकार्य मिळविले.
* राष्ट्रसभेच्या ब्रिटीश समितीचे कार्य
* सरकारविरुद्ध विजय
* राष्ट्रवादी भावनेची वाढ

राष्ट्रसभेचा पहिला कालखंड

* राष्ट्रसभेचे [ काँग्रेसचे ] पहिले अधिवेशन मुंबई येथे डिसेंबर १८८५ मध्ये भरले. त्या अधिवेशनात सर्व हिंदुस्तानातून एकूण ७२ प्रतिनिधी जमा झाले होते.
* दादाभाई नौरोजी यांनी Indian parliamentary Commitee  स्थापन केली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.